संयुक्तराष्ट्रे: करोनामुळे जगभर जे आर्थिक संकट उद्भवले आहे त्या संकटातून गरीब देशांतील नागरीकांना बाहेर काढण्यासाठी 6.7 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याचा निर्णय संयुक्तराष्ट्रांनी घेतला आहे. त्यासाठी विविध देशांनी, उद्योगपतींनी आणि श्रीमतांनी भरघोस मदत करावी. ही मदत झाली नाही तर या गरीब देशांमध्ये दुष्काळ, दंगली आणि भूकमरीची मोठी समस्या उद्भवणार आहे. या लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला ही मदत करावीच लागेल असे कळकळीचे आवाहन संयुक्तराष्ट्रांनी केले आहे.
संयुक्तराष्ट्रांच्या मानवाधिकार विागाचे प्रमुख लोकॉक यांनी म्हटले आहे की, पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्याला आणि प्रत्येक देशालाच या करोनाच्या समस्येने ग्रासले आहे. लोकांपुढे आता भूकेने बळी जाण्याची समस्या उद्भवली आहे. अन्न पुरवठा साखळी तुटली जाणार आहे, मुलांना लसी सुद्धा उपलब्ध होणे अवघड बनणार आहे. लोकांच्या अन्नाचीच समस्याहीं मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे.
गरीब देशांना तर या समस्येशी अधिक तीव्रतेने सामना करावा लागणार आहे. आरोग्य आणि अन्न या दोन्ही आघाड्यांवर त्यांची कुचंबणा होणार आहे. या संघर्षाच्या स्थितीतून संघटीतपणे बाहेर येण्यासाठी आपल्याला हा निधी उभारण्याची गरज आहे. संयुक्तराष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रमुख डेव्हीड बीस्ली यांनी म्हटले आहे की, जगातील 26 कोटी 50 लाख लोकांपुढे भुकेची समस्या तातडीने उभी राहणार आहे.