छत्रपूर – मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यातील एका कुटुंबातील सहा जणांना विजेचा धक्का लागल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज सकाळी ही घटना महुआ झाला गावात घडली. त्यांच्या घराजवळ एका सेप्टिक टॅंकच्या दुरुस्तीचे काम केले जात होते.
त्यावेळी कुटुंबातील एक जण या टाकीत उतरला. टाकीत प्रकाशासाठी लाईटची व्यवस्था केली गेली होती. त्यावेळी त्याला या विजेचा धक्का बसला. त्याला काय झाले म्हणून बघण्यासाठी कुटुंबातील बाकीचे सदस्य टाकीत उतरले त्यावेळी त्या सर्वांना या विजेचा धक्का बसून त्यांचेही निधन झाले.
विजेचा मुख्य प्रवाह बंद करून या सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत ते सर्व जण मृत झालेले होते. मृत व्यक्ती 20 ते 65 या वयोगटातील आहेत.