सिंधुदुर्ग – 2019 ला उद्धव ठाकरेंना नुसतं मुख्यमंत्री केलं नाही तर त्यांची सुंता केली,लव्ह जिहाद करून धर्मांतर केलय. म्हणूनच पाकिस्तान्यांची भाषा उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करत असल्याची टीका भाजप नेते नितेश राणे यांनी केली आहे. सिधुदुर्गात पत्रकार परिषद घेत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली.
आपल्या सडेतोड बोलण्यातून नितेश राणे अनेकदा ठाकरे गटाला डिवचत असतात. आजही त्यांनी खरमरीत शब्दात संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊत हा महाभारतातील शकुनीमामा आहे असं राणे यावेळी म्हणाले. उद्या जर उद्धव ठाकरेंच्या घरात भांडण झाली तर त्याला जबाबदार संजय राऊत असणार असं देखील यावेळी राणे म्हणाले.
संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांचा व्हिडीओ ट्विट केला होता त्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले,आदित्य ठाकरे आणि नाईट लाईफबाबत माहिती बाहेर काढावी यासाठी संजय राऊत यांनीं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच संविधान धोक्यात असत तर तुझ्यासारख्याने रोज सकाळी नऊ वाजता टीव्हीवर येऊन आमची सकाळ खराब केली असती का ? असा सवाल देखील राणेंनी यावेळी उपस्थित केला.
संजय राऊतला माहिती आहे का बाळासाहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने माय नेम इज खानचा विरोध केलेला. तेव्हा विरोध करायचे आणि आता तुम्हाला काश्मीर फाईल्स,केरला स्टोरी चालत नाही. मी आधीपासून सांगतोय उद्धव ठाकरेंचे धर्मांतर झालेले आहे,राजकीय लव्ह जिहाद झालेला आहे त्याचाच परिणाम आहे हा. 2019 ला नुसतं मुख्यमंत्री करून घेतलं नाही तर सुंता केली.. लव्ह जिहाद केला.. धर्मांतर केलं, म्हणूनच पाकिस्तानची आणि जिहाद्यांची भाषा हे उद्धव ठाकरे आणि त्यांची टोळी करत आहे अशा विखारी शब्दात नितेश राणे यांनी टीका केली.
नवा सिनेमा येणार
सुधीर सुनगंटीवार यांना भेटून केरला स्टोरीला करमुक्त करावं, अशी विनंती करणार असल्याचे देखील आईवेळी नितेश राणे यांनी सांगितले. तसेच काही दिवसात दिशा सालियन फाईल्स हा चित्रपट ही ओटीटीवर येणार आहे असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.