मुंबई – राम मंदिर सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांना अद्याप निमंत्रण न मिळाल्याचे समोर आले आहे. यावरून आता ठाकरे गट आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक टीका टिपण्णी सुरु असल्याचे पाहायला मिळते. ज्याचं कोणतही योगदान त्यासाठी नाही त्यांचा तो सोहळा आहे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. राऊतांच्या या टिकेवरून आता भाजप नेत्याने राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचं योगदान काय ? असा सवाल उपस्थित केला आहे.
आयोध्येमध्ये बाबरी मशीद ( Babari mashid ) पाडली गेली त्यावेळी बाबरी कोणी पाडली याची जबाबदारी घेण्यासाठी कोणी तयार नव्हते अशात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी ‘जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ असं सडेतोड वक्तव्य केले होते. त्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात शिवसेना ( Shivsena ) आणि अनेक शिवसैनिक यांचा संबंध राम मंदिराशी कायम स्वरूपी जोडला गेला. अशात राम मंदिर उभे राहताना शिवसेना (ठाकरे गट ) निमंत्रण नसल्याचे समोर आले आहे.त्यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत.
राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचं योगदान काय ? असा थेट सवाल भाजप नेते नितेश राणे ( Nitesh rane ) यांनी उपस्थित केला आहे. माध्यमांशी बोलताना राणे यांनी राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. राम मंदिर आंदोलनावेळी उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर कॅमेरा साफ करत बसले होते. असा टोला देखील राणे यांनी यावेळी लगावला.
काय म्हणाले होते संजय राऊत नेमकं ?
ज्यांनी राम मंदिरासाठी त्याग केला आहे मुरली मनोहर जोशी,आडवाणी,उद्धव ठाकरे असतील आम्ही सर्व जण असू आम्हा कोणालाही ते बोलावणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. ज्याचं कोणतही योगदान त्यासाठी नाही त्यांचा तो सोहळा आहे.. ज्यांचं आंदोलनात योगदान आहे त्यांना ते अयोध्येच्या सीमेवर देखील येऊ देणार नाहीत असं देखील राऊत यावेळी म्हणाले होते.