ठाणे – ठाण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दोन विधवांना एकूण 68 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची तडजोड रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, या महिलांच्या पतीचा एकाच दिवशी मावळ आणि ठाण्यातील रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी नुकसानभरपाईसाठी दावा केला होता. त्यांची प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आली होती. पहिल्या प्रकरणात सारिका थोरात (32) यांना 36 लाख 15 हजारांची भरपाई देण्यात आली.
गेल्या वर्षी 26 जून रोजी मावळ येथे एका रस्ते अपघातात इलेक्ट्रिशियन असलेल्या पती आनंद यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या प्रकरणात, शबाना अन्सारी (40) यांना गेल्या वर्षी जूनमध्ये ठाणे येथे झालेल्या अपघातात पती मोहम्मद सलीम अन्सारी यांच्या मृत्यूबद्दल 31.50 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जूनमध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या अपघातात पती चेतनचा मृत्यू झालेल्या भावना राजपूतला सर्वाधिक 75 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती.