नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाउंट तात्पुरते बंद करण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव आणला गेल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. यानंतर ट्विटर खाते तात्पुरते निलंबित मुद्यावरून काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर अशीच कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईवरून पुन्हा एकदा राहुल गांधींनी मोदी सरकार आणि ट्विटर हल्लाबोल केला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी व्हिडियो शेअर करत भाष्य केलं आहे की,’हि कारवाई म्हणजे देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला तसेच ट्विटर कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे.’
ते पुढे म्हणाले,’ हि कारवाई काँग्रेस पक्ष किंवा राहुल गांधींवर नाही तर हा र लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न आहे. असेही ते म्हणाले आहे.