नगर -तालुक्यात करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना विविध योजनेचे धान्य वितरीत करण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ व दोन किलो चणा डाळ व एक किलो तूर डाळ अशी 3 किलो डाळ एकत्रितपणे देणेत येणार आहे.
प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या शिधापत्रिकाधारकास प्रति व्यक्ती 3 किलो गहू प्रतिकिलो 2 रुपये प्रमाणे व तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो प्रतिकिलो 3 रुपये प्रमाणे व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ, चणाडाळ व जून महिन्याकरीता एक किलो तूर डाळ 3 किलो डाळ एकत्रितपणे देण्यात येणार आहे.
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रीका धारकांना मे व जून महिण्याचे प्रति व्यक्ती प्रति महा 5 किलो प्रमाणे एकत्रीत 10 किलो मोफत तांदूळ व मे व जून 2020 या दोन महिण्याचे प्रति कुटूंब प्रति महा 1 किलो प्रमाणे एकत्रीत 2 किलो चणा धान्य दुकानात उपलब्ध असलेल्या प्रमाणित यादीप्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे.