मनमाड : केमिकल्सची वाहतूक करणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जबर धडक दिली. या अपघातात टँकर पलटी होऊन आग लागली. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड घाटात घडली. या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला.
केमिकल्स नेणाऱ्या मोठ्या टँकरला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यामुळे टँकर उलटून पेटला. या अपघातात दोघा जणांना प्राण गमवावे लागले, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यात राहुड घाटात हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ होते, मात्र वेळीच आग विझवण्यात यश आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक 3 तास ठप्प झाली होती. अपघात स्थळापासून काही अंतरावर वाहतूक थांबवण्यात आली होती. टँकर मुंबई येथून केमिकल्स घेऊन धुळ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.