नारायणपेट – तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. हे दोन्ही पक्ष लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहेत आणि पैशाचे राजकारण करतात असे त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही पक्षांनी आमदारांचा घोडेबाजार घडववून आणला आणि सरकारे पाडण्याचेच काम केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सध्या तेलंगणात यात्रा करीत आहेत. आज येथे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, भाजप आणि टीआरएस पक्ष एकमेकांना मदत करतात. दिल्लीत टीआरएस भाजपला मदत करते. आणि भाजप तेलंगणात टीआरएसला मदत करते. दोन्ही पक्ष लोकशाहीच्या विरोधात आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.