नवी दिल्ली – राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यामध्ये एका आदिवासी महिलेला सार्वजनिकरित्या विवस्त्र करून गावाभोवती धिंड काढल्याच्या घटनेच्या व्हिडिओने राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या घटनेवरुन राज्याचे राजकारण तापले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी महिलेच्या पतीसह आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. चार जणांना ताब्यात घेतले
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करून या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, “सासऱ्यांसोबतच्या कौटुंबिक वादामुळे एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विवस्त्र केल्याचा व्हिडिओ प्रतापगड जिल्ह्यात समोर आला आहे. ही संपूर्णपणे कौटुंबिक बाब आहे. पोलीस महासंचालकांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी एडीजी क्राईमला घटनास्थळी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुसंस्कृत समाजात अशा गुन्हेगारांना स्थान नाही. या गुन्हेगारांना लवकरात लवकर तुरुंगात टाकून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
दरम्यान, कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी, या प्रकरणी त्वरेने कारवाई केल्याबद्दल गेहलोत सरकारचे कौतुक केले आहे.राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी कॉंग्रेसवर हल्ला चढवताना, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज संध्याकाळी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रतापगडला जाण्याची घोषणा केली.
धारियावाड विधानसभेचे आमदार नागराज मीणा म्हणाले, मला शुक्रवारी रात्री वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. या घटनेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. अशा घटना घडू नयेत. यावर पोलीस तातडीने कारवाई करतील.
अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्षाच्या संदर्भात भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी स्पष्टपणे सांगितले की, सत्ताधारी पक्ष दुफळीतील भांडणे सोडवण्यात व्यस्त आहे. उर्वरित वेळ दिल्लीतील घराणेशाहीला खूश करण्यात घालवला जात आहे. सर्वसामान्यांच्या अन्यायाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. राजस्थानची जनता राज्य सरकारला धडा शिकवेल.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री आणि राजस्थानचे भाजप नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी धक्कादायक कथित व्हिडिओ ट्विट केला आणि म्हटले की या घटनेने कॉंग्रेसचा ढोंगीपणा उघड झाला आहे. त्यांनी विचारले की राहुल गांधी अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याची मागणी करतील आणि राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करतील का?
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण? दोन दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी अहवालही दिला नाही! कॉंग्रेसचा ढोंगीपणाही आता उघड झाला आहे. आता राहुल गांधी कुठे आहेत? धरियावाडला कधी येणार? अशोक गेहलोत यांचा राजीनामा घेऊन राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची, याबाबत कोणीच बोलत नाहीये.