नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पब्लिक कर्फ्यूची मुदत संपण्याआधीच भारत सरकारने देशातील कोरोना बाधीत सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे.
देशात 75 जिल्ह्यात कोरोना बाधीत सापडले आहेत. ते सर्व लॉक डाऊन करण्यात येणार आहेत. तेलंगणा सरकारने जनता संचारबंदी सोमवारी सकाळपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक सरकारने संपूर्ण बंद 31 मार्चपर्यंत जाहीर केला आहे. केरळमध्ये त्रिवेंद्रम आणि आर्थिक राजधानी एर्नाकुलमसह सहा जिल्ह्यात पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तत्पुर्वी, रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रकारच्या प्रवासी रेल्वे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व शहरातील मेट्रो सर्व्हीस बंद करण्यात आली. रेल्वेच्या मालसेवा मात्र सुरू राहणार आहेत.