Voting till 1 pm । देशातील 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचे दुपारी १ वाजेपर्यंतची आकडेवारी जाहीर केली आहे. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वात कमी महाराष्ट्रात मतदान झाल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रात मतदारांची मतदानाकडे पाठ Voting till 1 pm ।
प्राप्त माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणात बजावला असल्याचे दिसून येतंय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
दरम्यान, आता कोणत्या राज्यांमध्ये किती टक्के मतदान झाले, याचीही आकडेवारी समोर आली आहे. ती पाहून घेऊ.
राज्यांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी Voting till 1 pm ।
बिहार – 34.62 टक्के
जम्मू आणि काश्मीर – 34.79 टक्के
झारखंड – ४१.८९ टक्के
लडाख – 52.02 टक्के
महाराष्ट्र – 27.78 टक्के
ओडिशा – 35.31 टक्के
उत्तर प्रदेश – ३९.५५ टक्के
पश्चिम बंगाल – ४८.४१ टक्के
49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात
दरम्यान, पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत. आज महाराष्ट्रातील १३, उत्तर प्रदेशातील १४, पश्चिम बंगालमधील सात, बिहारमधील पाच, झारखंडमधील तीन, ओडिशातील पाच आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात कमीत कमी (४९) जागांवर मतदान होणार आहे.