सातारा : कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.
मात्र, संचार बंदी असूनही काही युवक रस्त्यावर वारंवार फिरत होते. याच वारंवार फिरणार्या युवकांना अखेर पोलिसांनी खाक्या दाखवला व त्याची चूक लक्षात आणून देत रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सातारा शहरातील नगरपालिकेजवळील चौकात सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. याठिकाणावरुन एक दुचाकी सतत जात असल्याने त्यांना बाहेर न फिरण्याच्या सुचना दिल्यानंतरही ते बाहेरच फिरत असल्याने त्यांना अखेर पोलिसी खाक्या दाखवण्यात आला.