1. नव्या राजकीय समीकरणाचा उदय ! शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती | top 10 news today
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेची वाटचाल नेमकी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आगामी राजकीय वाटचालीसाठी शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची घोषणा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाईसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
2. गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस सोडली
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संबंधात त्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना एक विस्तृत पत्र लिहून आपल्या राजीनाम्याची कारणे विशद केली आहेत. त्यात त्यांनी पक्षाचा कारभार सध्या एका चौकडीच्या हातात गेल्याचा आरोप केला असून पक्षाच्या निवडणुकांची प्रक्रियाही गैरपद्धतीने राबवली गेल्याचे म्हटले आहे. गेली 50 वर्ष गुलामनबी आझाद कॉंग्रेसमध्ये कार्यरत होते त्यांच्या जाण्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
3. गुलामनबी आझाद नवीन पक्ष काढणार? | top 10 news today
कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता गुलामनबी आझाद यांची पुढील रणनिती काय असेल या विषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहे. तथापि त्यांच्या काही निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ते स्वत:चा नवीन पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस मध्ये 50 वर्ष विविध पदे भुषवल्यानंतर त्यांना भाजप मध्ये जाणे प्रशस्त ठरणार नसल्याने त्यांनी या पर्यायाचा विचार सुरू केल्याचे सांगण्यात येते.
4. आझाद यांना कॉंग्रेसने सर्वकाही दिले; पक्षावर आरोप करणे चुकीचे – अशोक गेहलोत
ज्या व्यक्तीला गेली 42 वर्षे कॉंग्रेस पक्षाने कोणत्यातरी पदावर कायम ठेवले. त्यांच्याकडे पदच नाही असे कधीच होऊ दिले नाही. त्या आझाद यांनी पक्षाबाबत असे बोलावे याची देशातील कोणीच अपेक्षा केली नसेल. आझाद यांची देशातील ओळख ही इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव आणि सोनिया गांधी यांच्यामुळे आहे. मात्र त्यांनी ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या योग्य म्हणता येऊ शकत नाही. अशी भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मांडली.
5. सीबीआयची भूमिका सिरियल किलर सारखी | top 10 news today
मनिष सिसोदिया यांची जहरी टीका
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी सांगितले की, सीबीआयने त्यांच्या विरोधात दाखल केलेला एफआयआर “पूर्णपणे खोटा” आहे आणि भाजपशासित केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्य सरकारांना संपवण्यासाठी सीबीआय सीरियल किलरसारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सिसोदिया बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला, इतरांनी केलेले चांगले काम पाहून मोदी स्वत:ला असुरक्षित समजू लागतात.
6. देशातील सर्व टोलनाके होणार हद्दपार
गाडीची नंबर प्लेट पाहून खात्यातून होणार रक्कम कपात
देशभरात सर्वत्र महामार्गांचे जाळे उभारण्यात आले आहे आणि या महामार्गावर अनेक टोलनाके सुद्धा कार्यरत आहेत. फास्टटॅगसारख्या यंत्रणेच्या माध्यमातून टोल वसुली केली जात असली तरी भविष्यात सर्व टोलनाके हद्दपार होणार सून फक्त गाडीच्या नंबर प्लेटच्या आधारेच परस्पर टोलची रक्कम कपात होणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकतेच अशा प्रकारचे संकेत दिले असून नजीकच्या कालावधीमध्ये ही यंत्रणा देशभरात सर्वत्र राबवण्यात येणार आहे.
7. 15 दिवस आधीच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू | top 10 news today
दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या 17 तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. यंदा साधारण 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप सुद्धा घेतो. पण यावर्षी मात्र मान्सून 15 दिवस आधीच निरोप घेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसा संदर्भातील एक महत्वाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मागील वर्षी मान्सूनचे आगमन झाल्यानंतर तो बराच लाल रेंगाळला होता. पण यावर्षी मान्सून 15 दिवस आधीच निरोप घेणार असल्याची शक्यता आहे.
8. सोनाली फोगट संशयास्पद मृत्यू प्रकरण
दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात
हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे या कथित हत्येप्रकरणी गोवा पोलिसांनी रात्रभर चौकशी केली. सुधीर सागवान आणि सुखविंदर वासी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सोनाली फोगटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोनाली फोगट यांचा मृत्यू अनैसर्गिक होता अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून मिळाली आहे.
9. भारत-अमेरिका करणार “युद्धाभ्यास’ | top 10 news today
चीनचा आक्षेप फेटाळला
भारत आणि अमेरिका यांच्यात ऑक्टोबर महिन्यात युद्ध सराव करण्यात येणार आहे. या सरावावर चीनने आक्षेप नोंदवला होता. मात्र, भारताने हा आक्षेप फेटाळून लावला आहे. हा युद्धसराव उत्तराखंडमध्ये होणार आहे. भारत-चीन सीमाप्रश्न सर्वज्ञात आहे. त्यामुळे चीनने भारत-अमेरिका युद्धसरावावर आक्षेप घेतला. अशी प्रतिक्रिया भारताने चीनच्या आक्षेपावर दिली आहे.
10. उद्यापासून आशिया करंडक टी-20 क्रिकेटचा थरार
करोनामुळे गेली दोन वर्षे आयोजित न होऊ शकलेली आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. या स्पर्धेची सलामीची लढत यजमान देश असलेल्या श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. ही स्पर्धा आशिया क्रिकेट समितीने श्रीलंकेच्या यजमानपदात खेळवण्याचे निश्चित केले होते. मात्र, श्रीलंकेतील अराजकता तसेच खालावलेली आर्थिक स्थिती पाहता ती अमिरातीत हलवण्यात आली आहे.