नवी दिल्ली : देशात करोनाचा थैमान सुरु आहे त्यातच आता देशातील अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी सरकारकडून हळूहळू प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी आज देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे म्हटले.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधानांनी, आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसंच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहवं लागंल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत,” असे म्हटले.करोनाच्या संकटादरम्यान त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (ICC) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली.
We have to revive the historical excellence of Bengal in manufacturing sector. We've always heard "What Bengal thinks today, India thinks tomorrow". We have to take inspiration from this and move forward together: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/rOkhCIOuvz
— ANI (@ANI) June 11, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात बंगाली भाषेतून केली. “गेले ९५ वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. तसंच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं आता कमी करावं लागणार आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. “स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचं हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्याने पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असं म्हटलं जात,” असेही त्यांनी नमूद केले.