रायपूर – छत्तिसगढमधील चकमकीत सोमवारी सुरक्षा दलांनी 3 नक्षलवाद्यांना ठार केले. त्यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. ती चकमक कांकेर जिल्ह्यातील जंगलात झडली.
पोलीस आणि प्रशासनाने मारल्या गेलेल्या तिन्ही नक्षलवाद्यांसाठी मिळून 18 लाख रूपयांचे इनाम जाहीर केले होते. त्यामुळे तिघांचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश मानले जात आहे. त्या चकमकीत सशस्त्र सीमा बलाचा (एसएसबी) एक जवान जखमी झाला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा जप्त करण्यात आला.
छत्तिसगढच्या बस्तर विभागात पंधरवडाभरात मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 7 इतकी झाली आहे. दरम्यान, छत्तिसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात 5 नक्षलवादी पोलिसांपुढे शरण आले. शरणागती पत्करलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.