जालना : वीज अंगावर पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील भागडे सावरगावमध्ये घडली त्यामुळे या भागावर शोककळा पसरली आहे. याबरोबरच अन्य एका घटनेत सोनदेवगावमध्येही वीज पडल्याने दोन महिला जखमी झाल्या. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली आहे.
पाऊस आल्यावर भागडे सावरगावमधील सुमनबाई नाईकनवरे यांच्या शेतातील मजूर आडोश्यासाठी एका झाडाखाली थांबले. त्यावेळी झाडावर वीज कोसळली. त्यात तीन शेतमजूरांचा मृत्यू झाला.
स्थानिकांनी माहिती क्लिवताच पोलीस घटना सुटली दाखल झाले. त्यांनी मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुगणालयात पाठवले.