इंदापूर – इंदापूर तालुक्यामध्ये सामाजिक जाणिव व एकोपा दिसणे गरजेचे आहे. माजी खासदार शंकरराव भाऊ पाटील, आमदार गणपतराव पाटील तसेच राजेंद्रकुमार घोलप, गोकुळदास शहा व अन्य नेत्यांनी तालुक्यामध्ये काम करत असताना कधीही वैयक्तिक द्वेष राजकारणामध्ये केला नाही. हिच प्रथा परंपरा सर्वच पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जपावी, अशी अपेक्षा आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते यांनी व्यक्त केली.
इंदापूर येथे संक्राती सणाचे निमित्ताने पत्रकारांशी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल देवकाते यांनी संवाद साधला. यावेळी देवकाते बोलत होते.
देवकाते पुढे बोलताना म्हणाले, नाम फलकावरून वाद करण्याची काही गरज नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींनी कान उघडणी करणे गरजेचे आहे. राजकारण समाजकारण करत असताना सामाजिक भान असणे गरजेचे असते.आयुष्यात येऊन कुणाचे मन दुखेल असे वक्तव्य करणे समाजासाठी दुःखद असते.
कार्यकर्त्यांनी संकुचितपणा न ठेवता प्रत्येकाच्या पक्षाची विचारधारा विचारसरणी वेगळे असले तरी एकमेकांबद्दल खिलाडूपणा ठेवणे गरजेचे आहे. सर्वांशी मैत्रीचे, आनंदाचे संबंध संक्राती सणाच्या निमित्ताने ठेवूयात, असा संकल्प आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्षअमोल देवकाते यांनी व्यक्त केला.