बेंगळूरू – डबल लेअर मास्कमुळे एरोसोलची निर्मिती घटते व त्यामुळे करोना विषाणूचा धोका टळतो, असा दावा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी म्हटले आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा कफाचे कण 200 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे असतात. ते साध्या मास्कच्या धाग्यातून तोंडावर जाऊ शकतात. तसेच त्याचे आणखी कण तयार होतात.
मात्र, जर प्रत्येकाने डबल लेअर मास्क वापरला तर करोनाचा तसेच अन्य कोणत्याही विषाणूंचा प्रसार रोखता येतो. हाय स्पीड कॅमेऱ्याच्या मदतीने हे स्पष्ट झाले आहे. डबल लेअर मास्कमूळे हा धोका आपण रोखू शकतो, असाही दावा या संशोधकांनी केला आहे.