नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात शनिवारी मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर या वादाने हिंसक वळण घेतले होते. काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जहांगीरपूर येथे आरएएफचे दोन तुकडी तैनात केली आहे. यावरुन आता चांगलेच राजकारण तापले असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
देश का माहौल जानबूझकर चुनाव जीतने के लिए जिस तरह से खराब किया जा रहा है, मुझे लगता है यह देश के लिए ठीक नहीं है। दिल्ली में कल हनुमान जयंती और रामनवमी पर हमला हुआ था इससे पहले यह कभी नहीं हुआ करता था…: शिवसेना के नेता संजय राउत, मुंबई, महाराष्ट्र pic.twitter.com/tsdGj6RkJn
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2022
संजय राऊत म्हणाले, ‘निवडणुका जिंकण्यासाठी ज्या प्रकारे देशातील वातावरण जाणीवपूर्वक बिघडवले जात आहे, ते देशासाठी चांगले नाही, असे मला वाटते. काल दिल्लीत हनुमान जयंती आणि रामनवमीला हल्ला झाला होता, याआधी असे कधी झाल नाही’
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्रातसुद्धा हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या निमित्ताने तणावाचे आणि दंगेसदृश्य वातावरण करण्याचे षडयंत्र रचले होते. पण महाराष्ट्राचे पोलीस आणि जनता यांनी हे वातावरण उधळून लावले आहे. यापुढे सुद्धा राज्याची जनता कोणत्याही प्रकारचे षडयंत्र कोणी रचत असेल तर ते उधळून लावेल’असा इशारा संजय राऊत यांनी दिला.