मुंबई – राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे मंत्री नवाब मलिक यांनी आज स्पष्ट केलो. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकडाच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुस्लीम नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी बकरी ईद संदर्भातील नियमावलीवर स्पष्टीकरण दिले.
बकरी ईदसंदर्भात कोणतेही गैरसमज नाही. गृहमंत्री अनिल देशमुख याबाबतचे गैरसमज अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. ज्यांनी बकरी ऑनलाइन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल, असे नवाब मलिक म्हणाले.