मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकणारे सत्तांतर महाराष्ट्रासह अवघ्या देशाने पाहिले. त्यानंतर सुरु झालेली न्यायालयीन लढाई देखील अवघ्या देशाने पाहिली.आज दुपार नंतर या सत्तासंघर्षाचा निकाल येणार आहे. तत्पूर्वी दावे प्रतिदावे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु झाल्याचे पाहायला मिळते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या निकालाबाबत भाष्य केले आहे. यामध्ये सरकार विरोधात निकाल येण्याची दाट शक्यता असलयाचे त्यांनी म्हंटले आहे.
सत्तासंघर्षांवर नेमकं काय निकाल लागणार याकडे संपूर्ण देश लक्ष ठेऊन आहे.न्यायालयाने देखील हा निकाल ऑनलाईन पद्धतीने सर्वांना पाहता येण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक निकाल सर्वांना पाहता येणार आहे. अशात अंजली दमानिया यांनी ट्विट करत निकालाबाबत भाष्य केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये दमानिया म्हणतात,”अध्यक्ष परदेशात, जयंत पाटलांना ED नोटिस यावरून निर्णय या सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता? निर्णय खरच जर आताच्या सरकार विरुद्ध आला, तर मात्र कोर्टाचे निकाल, आधी कसा लीक झाला, ह्यावर कोर्टालाच गांभीर्याने विचार करावा लागेल.”
अध्यक्ष परदेशात, जयंत पाटलांना ED नोटिस यावरून निर्णय या सरकार विरोधात येण्याची दाट शक्यता? निर्णय खरच जर आताच्या सरकार विरुद्ध आला, तर मात्र कोर्टाचे निकाल, आधी कसा leak झाला, ह्यावर कोर्टालाच गांभीर्याने विचार करावा लागेल.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 11, 2023
संजय राऊतांनी देखील केलं मोठं विधान
माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केले. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. १६ आमदार अपात्र ठरले तर उर्वरित २४ देखील अपात्र होतील आणि हे सरकार कोसळेल असं राऊत यावेळी म्हणालेत. तसेच विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना देखील राऊत यांनी यावेळी टोला लगावला. अपात्रतेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचे देखील नाव आहे. ते अपात्र झाल्यास गद्दारांचा शिंदे गट संपून जाईल असही राऊत यावेळी म्हणाले.