मुंबई – कृषी पंपाच्या वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरली तर शेतकऱ्यांना 50 टक्के वीजबिल माफी मिळणार, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली.
ऊर्जा विभागातील शेती विषयक धोरणं या बैठकीत मांडण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शनबाबत निर्णय यावेळी घेण्यात आला. ग्रामीण भागात शेती पंपांची बिकट अवस्था आहे. आता 66 टक्के निधी त्यासाठी वापरण्यात येईल. 40 हजार कोटींची थकबाकी होती, त्याबाबत निर्णय घेण्यात आला
. शेतकऱ्यांची मागील 5 वर्षांची थकबाकी होती, त्याचे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय
* 2018 नंतर कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येत नव्हते
* आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपांना वीज कनेक्शन देता येईल
* शेतकऱ्यांकडे 40 हजार कोटींची थकबाकी आहे
* मागील पाच वर्षांतील डिले चार्जेस रद्द केले जाणार आहेत
* थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांनी भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार आहे
* 2 लाखांच्या वर कृषी कनेक्शन देण्याचा निर्णय