धुळे – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे धुळे दौऱ्यावर असून त्यांनी विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुमचं किती ऐकलं, काही दिल तर नाही; परंतु त्यांनी बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय विभागातूनच बाजूला केले. अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुमचं किती ऐकलं, काही दिल तर नाही; परंतु त्यांनी बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय विभागातूनच बाजूला केले. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंडे यांनी केली आहे.
आपल्याला ‘ब’ मधून ‘क’ मध्ये जाण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून जे पणाला लावता येईल ते लावेल असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले आहे. भाजप शेतकरी आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या समाजाला समूळ नष्ट करण्याच काम करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. ते ठेलारी समाजाच्या एका कार्यक्रम दरम्यान बोलत होते.
वाड्या वस्तीवर राहणारा समाज आणि त्यांचे उपकार इतर समाजावर आहेत. ठेलारी समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्याच अडीचनी आमच्या समाजाच्या आहेत. आपल्या सगळ्या मागण्या महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर सोडवू. असे आश्वासन मुंडे यांनी दिले आहे.
दरम्यान, मुंडे यांनी पेट्रोल दरवाढीवरून सुद्धा केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदींनी लस मोफत दिली परंतु,100 रुपये पेट्रोल घेणार्यांना लस कितीला पडली याचा विचार करा. लसीचे पैसे मोदींनी पेट्रोल दर वाढवून वसूल केले.