कोल्हापूर – कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत कॉंग्रेसचा झालेला विजय हा कॉंग्रेसला ऊर्जा देणारा तर भाजपसाठी चिंता व्यक्त करणारा आहे.या निवडणुकीत भाजपचे मताधिक्य वाढले असले तरी त्यांचा पराभवही मोठ्या फरकाने झाला आहे.भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड या निवडणूकीत साफ खोटे ठरले तर महाविकास आघाडी आणखी घट्ट झाल्याचे दिसून आले.त्यामुळे आगामी महानगरपालिकांची लिटमस टेस्ट समजल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीच्या निकालाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
कोल्हापूरच्या या पोटनिवडणुकीत जिंकायचेच या इराद्याने भाजपने फिल्डिंग लावली होती.नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकीत मिळालेल्या यशाने आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने ही पोटनिवडणुक बिनविरोध होऊ दिली नाही.तसा भाजपवर आरोपही होतो आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.
तर दुसऱ्या बाजूला पालकमंत्री सतेज पाटील यांनीही दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री याना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचा चॅंग बांधला.अण्णांच्या माघारी,आता आपली जबाबदारी.म्हणत त्यांनी कोल्हापूरकराना साद घातली होती.मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते या प्रचारात विविध पातळीवरून उतरले होते.यात झालेल्या आरोप प्रत्यारोपात हिंदुत्व विरुद्ध पुरोगामीत्व या पातळीवर गलेल्या या निवडणूकीत अखेर कॉंग्रेसने यश मिळवत भाजपचे हिंदुत्वाचे कार्ड फेल ठरवले.सतेज पाटील यांनी जनतेने भाजपला साफ नाकारल्याचे म्हंटले आहे. तर या निवडणुकीत भाजप एकटा लढूनही मताधिक्य मिळवल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. तर जनतेचा कौल त्यांनी मान्य केला आहे.
दरम्यान भाजपच्या नगरसेविका असतानाही भाजपने आपणाला बिनविरोध करण्याची गरज होती मात्र निवडणूक लादली यामध्ये कोल्हापूरच्या जनतेने चंद्रकांत दादांना उत्तर दिल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूरच्या या निवडणुकीत दोन पाटलांच्यात झालेल्या सामन्यात सतेज पाटील सरस ठरले आहेत.त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विजय खेचून आणत कॉंग्रेसला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आगामी काळात भाजपला कॉंग्रेस टक्कर देऊ शकतो हे सिद्ध झाले आहे.त्यामुळे आगामी महापालिकेची लिटमस टेस्ट ठरणारा हा निकाल भाजपची चिंता वाढवणारा आहे असेच म्हणावे लागेल.