PM Modi On Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर हल्लाबोल करत युपीए सरकार हँग मोडमध्ये होते त्यात बदल करण्यासाठी त्यांनी बॅटरी बदलली पंरतु काहीच फायदा झाला नाही असे म्हणत मिश्किल टिप्पण्णी केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC) ला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, “2014 ही कोणती तारीख नाही, तो एक बदल” आहे. असे म्हणत ‘एनडीए सरकारच्या कार्यकाळाचे कौतुक केले. पुढे गेल्या एका वर्षात भारतात मोबाईल ब्रॉडबँडचा वेग तीन पटीने वाढला आहे. 2G दरम्यान काय घडले ते त्याविषयी मी बोलणार नाही, नाहीतर त्याचीही बातमी होईल. आमच्या काळात, 4G चा विस्तार करण्यात आला आणि त्यात एकही अडचण आली नाही,” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना, ‘यूपीएच्या कार्यकाळावर हल्लाबोल करताना, “त्यावेळी सरकार हँग मोडमध्ये होते. परिस्थिती अशी होती की रीस्टार्ट करूनही काही फायदा झाला नाही. बॅटरी चार्ज करूनही काही फायदा झाला नाही आणि बॅटरी बदलूनही., ‘असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
2014 मध्ये आम्ही देशात कालबाह्य सरकार सोडले असल्याचे म्हणत भाजपच्या कार्यकाळाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. तसेच पंतप्रधान मोदी म्हणाले, “त्यावेळी आम्ही मोबाइल फोनचे आयातदार होतो, आज आम्ही मोबाइल फोन निर्यात करतो. भविष्य हेच आहे . 5G मोबाइल सेवा भारतात सर्वात जलद सुरू झाली आहे. एका वर्षात चार लाख 5G बेस स्टेशन स्थापित करण्यात आले आहेत. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत 118 व्या स्थानावरून आता 43 व्या स्थानावर पोहोचला आहे.
दरम्यान, भारताच्या भविष्याविषयी आणि गेल्या नऊ वर्षांत देशाला आयातदाराकडून निर्यातदार बनवणाऱ्या बदलांवर पंतप्रधान मोदी हे म्हणाले, “6G मध्ये भारत आघाडीची भूमिका बजावेल. भांडवल, संसाधने आणि तंत्रज्ञानात प्रवेश हे सरकारचे प्राधान्य आहे. जग ‘मेड इन इंडिया’ फोन वापरत आहे.” असे त्यांनी म्हटले.