नवीदिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन दिवसीय गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली.यावेळी त्यांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर केवडिया परेड मैदानावरील राष्ट्रीय एकता दिवस परेड कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावली.
मोरबी पूल दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले- मी एकता नगरमध्ये आहे, माझे मन मोरबीतील पीडितांशी जोडले गेले आहे. अशी वेदना मी माझ्या आयुष्यात क्वचितच अनुभवली आहे असं म्हणत पंतप्रधानांनी प्राण गमावलेल्याप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली. तसेच अपघातग्रस्तांना शक्य ती मदत केली जाईल असे आश्वासन देखील मोदींनी यावेळी दिले.
पीएम मोदी म्हणाले, मी 2022 मधील राष्ट्रीय एकता दिवस अतिशय खास प्रसंग म्हणून पाहतो. याच वर्षी आपण स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. आम्ही नवीन संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. भूतकाळाप्रमाणेच भारताच्या उदयामुळे त्रासलेल्या शक्ती आजही आहेत. जातींच्या नावावर लढण्यासाठी विविध नेरेटिव्ह तयार केल्या जातात. देश एकमेकांशी जोडले जात नाहीत आणि दूर होतात. अशा पद्धतीनेही इतिहास मांडला जातो. अनेक वेळा ही शक्ती गुलामगिरीच्या मानसिकतेच्या रूपाने आपल्यात अंतर्भूत होते.भारताची एकता शत्रूंच्या डोळ्यात खुपत आहे.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान यावेळी
भारताची ‘एकता’ आमच्या शत्रूंना वेदना देत आहे.
जात, भाषा आणि वंशाच्या आधारे देश तोडण्याचा प्रयत्न करत असलेले आमच्या प्रगतीमुळे आजही आमचे शत्रू दुखावले आहेत.
आमची एकता तोडण्याचा प्रयत्न करणारे केवळ बाह्य शत्रू नाहीत तर ते देशाच्या आतही आहेत.
जातीच्या नावाखाली आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभे करण्यासाठी स्टेटर्जी तयार केल्या जातात.
प्रदेशांच्या नावावर आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका भारतीय भाषेला दुसऱ्या भारतीय भाषेचा शत्रू बनवण्यासाठी मोहिमा सुरू केल्या जातात.
अशा शक्तींपासून सावध राहून त्यांच्या कारस्थानांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे.