मुंबई – अनलॉकनंतर करोना रुग्णांच्या संख्येत झापाट्याने वाढ होत आहे. आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत आज 24 तासांमध्ये तब्बल 5493 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचला आहे.
तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाल्याने मृत्यूचा आकडा 7429 वर गेला आहे. 60 मृत्यू गेल्या 48 तासातले आहेत तर उर्वरित मृत्यू मागील काही काळातले आहेत. राज्यात मृत्यू दर 4.51 टक्के आहे.