मुंबई : राज्यात आज एकाच दिवशी 552 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे करोना बाधितांची राज्यातील संख्या 5,218 इतकी झाली आहे, अशी माहिते आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरात आज 19 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या 251 इतकी झाली आहे.
मुंबईमध्ये आज दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात तिघांचा,ठाण्यामध्ये दोघांचा आणि सांगली, पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. 150 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले, त्यामुळे करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 722 इतकी झाली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.