नवी दिल्ली – उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथील हिंसाचारानंतर स्थानिकांच्या स्थलांतराचा वेग वाढला आहे. किमान ३०० कुटुंबांनी घरांना कुलूप लावूनराअपला गाव सोडला आहे. हल्दवानी पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने लोक बनभूलपुरा सोडत आहेत, असे समजते. रविवार-सोमवारी सकाळी वाहने उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पायीच लालकुवान गाठले. येथून ते रेल्वेने बरेलीला रवाना झाले. बहुतांश कुटुंबे उत्तर प्रदेशात स्थलांतरीत होत आहेत.
शनिवारी पोलिसांनी बनभूलपुरा भागातून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या काळात पोलिसांनी सौम्य बळाचाही वापर केल्याचा आरोप आहे. कर्फ्यू अनेक दिवस टिकेल या भीतीने आणि पोलिसांच्या भीतीने लोकांनी स्थलांतराला गती दिली आहे. सोमवारीही पहाटे पाच वाजल्यापासून अनेक कुटुंबे सामान घेऊन बरेली रोडवरून चालताना दिसले.
२५ दंगलखोरांना अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या २५ आरोपींविरुद्ध दंगल, दरोडा, सरकारी मालमत्तेचे नुकसान, खून अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्व बदमाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर पुराव्याच्या मदतीने ११ अनोळखी लोकांना अटक केल्याचे सांगितले. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सातत्याने छापे टाकले जात आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल. अनेक आरोपींच्या घरांतून बंदुका किंवा काडतुसे जप्त केली जात आहेत.