नवी दिल्ली : देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील हातबल झाली होती. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना प्राण गमवावा लागला.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एकाही करोनाबाधिताचा मृत्यू कोणत्याही राज्यात अथवा केंद्र शासित प्रदेशात झाला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी अभूतपूर्वरित्या वाढली पहिल्या लाटेत असणारी तीन हजार 95 टन वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेत नऊ हजार मेट्रिक टनवर पोहोचली, असे त्यात म्हटले आहे.
करोनाचे रुग्ण रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या संख्येने मरण पावले, अशा आशयाच्या प्रश्नाल उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, आरोग्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अखत्यारीतील विषय आहे. ते दररोजचे मृतांचे आकडे केंद्राला कळवत असत.