शेतकरी शेती कामात गुंतला
लाखणगाव- सध्या पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने आंबेगाव तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आंबेगाव तालुक्यासह लगतच्या तालुक्यातही पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी कामात गुंतलेले दिसून येत आहेत. पावसाने डोंगर-पठारे हिरवीगार झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सध्या सुटला आहे.
आंबेगाव तालुक्यात सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे.
तालुक्यातील चाऱ्याचा प्रश्न जरी सुटला असला तरी लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी या गावांच्या पाण्याची समस्या अजूनही कायम आहे. परिसरात बाजरी, मूग, उडीद या पिकांची खुरपणी सावड पद्धतीने सुरू आहे. सध्या तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी उघडीप दिल्याने शेतीकामे सुरू आहेत. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.