वाल्हे -पितृपक्षात घरोघरी घातल्या जाणाऱ्या श्राद्ध तिथीमुळे तथा करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना गावात येण्यास मज्जाव असल्याने भाज्यांची आवाक घटल्याने भाज्याचे दर “कडाडले’ आहेत. आधीच करोनामुळे पैसा नाही त्यात भाज्यांचे दर कडाडल्याने गृहिणीचे “बजेट’ कोलडले आहे. वाल्हे येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो.
मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने बाहेर गावच्या व्यापारीवर्गाला येण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील महिन्याभपासून पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील भाजीपाला खराब झाला असल्याने बाजारामध्ये भाजीपाला जास्त प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, तसेच पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी लागणारे भाजीपाला मागणीच्या प्रमाणांमध्ये कमी उपलब्ध होत असल्याने भाजीपाल्याचे बाजारभाव वाढले आहेत.
बाजारातील काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत, तर काहींचे भाव 10 ते 20 रुपयांनी वाढले आहेत. पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या गवार, भेंडी, लाल भोपळा, कारले, काकडी, मेथी तसेच, अळूच्या पाने, डाळींब आदींची मागणी वाढली आहे.