पंखुरी अवस्थी सध्या “ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. या शोमध्ये शिवांगी जोशी आणि मोहसीन खान मुख्य भूमिकेत आहेत. या सिरीयलचा एक भाग असण्याबरोबरच पंखुरी अवस्थीने अलीकडेच आपल्या पदवीचा अभ्यासही पुन्हा सुरू केला.
पंखुरीलाही राजकारणात मोठी रस आहे. त्याबद्दल ती म्हणाली, कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्यातल्या करियरबद्दल विचार करतो, माझ्याकडे चार पर्याय होते. प्रथम करिअरपेक्षा जन्मजात उत्कटतेने अभिनय करणे, दुसरे म्हणजे मी एमबीए करत होते, तिसरे म्हणजे मी शिकवत होते ज्यासाठीच्या कोर्ससाठी मी सुरुवातही केली होती. आणि चौथा पर्याय म्हणजे राजकारण. राजकीय फॅब्रिकच्या बाबतीत दिल्ली विद्यापीठाचे नाव आवर्जुन पुढे येते. तिने एनएसयूआय, एबीव्हीपी आणि एआयएसए यासारख्या विद्यार्थी संघटनांची कॅम्पसमध्ये खूप गर्दी असते. जेंव्हा पंखुरी विद्यापिठातील राजकारणात होती आणि जेव्हा विरोधी पक्षांमधील लोक रॅलीच्या वेळी प्रत्यक्ष संघर्ष करीत असत तेव्हा ती तेथून निघून जायची, असेही पंखुरीने सांगितले.
राजकारणात सामील होणे म्हणजे देशाची सेवा करणे होय, पण त्यावेळी मला तसे वाटत नव्हते. कदाचित नंतर माझ्याकडे काम असेल आणि मला योग्य अनुभव मिळाला नसेल, असे पंखुरी अवस्थी म्हणाली, आता मात्र तिला राजकार्ण म्हणजे केवळ झुंडशाही असे वाटत नाही. त्यामुळे राजकारणात उतरण्याची तिची ईच्छा अधिक तीव्र झाली आहे. ऍक्टिंग हा तिचा पहिला पर्याय होता. मात्र त्याबाबत तिच्याकडे कोणताच विचार नाही. कदाचित राजकारण हा शेवटचा पर्याय म्हणून तिने ऍक्टिंगकडे दुर्लक्ष करायचे ठरवले असावे.