नांदेड – नांदेड मधील काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचार रॅलीदरम्यान राहुल गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाणा बनवले आहे. ‘सर्वच चोरांचे नाव मोदी कसे काय असू शकते?’ असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
पंजाब नॅशनल बँकेला चुना लावून देशातून पळून गेलेला भामटा ‘नीरव मोदी’आणि आयपीएलचा माजी अध्यक्ष ‘ललित मोदी’ यांच्या यादीत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव जोडले आहे. मात्र,राहुल गांधी यांच्या या टीकेनंतर भाजपने निवडणूक आयोगाकडे धावघेतली आहे. भाजप नेत्यांनी याप्रकरणी राहुल गांधी हे लोकांचा जातीवरुन अपमान करत असल्याची तक्रार केली.