नवी दिल्ली : भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. त्यानंतर पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडतच जात आहे. कारण आता चहापानादेखील पाकिस्तानकडे पैसे नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही माहिती पाकिस्तानच्याच प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली असल्याचे सांगितले तसेच या कारणामुळेच त्यांनी चहापानावर होणारा खर्च देखील न परवडत नसल्याचे सांगितले. या हलाखीच्या परिस्थितीसाठी पाकच्या सरकारने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सरकारकडून दिला जाणारा चहा-बिस्किटावर बंदी घालण्याची नामुष्की पाकिस्तानवर ओढावली आहे. आहे. या निर्णयामुळे ज्या अधिकाऱ्यांना मधुमेहसारखा आजार आहे त्यांना तासंतास चालणाऱ्या बैठकीत काहीही न खाता बसणे कठीण असल्याचे देखील पाकिस्तानी वृत्तपत्राने म्हटले आहे. भारताने जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळेच, इम्रान खान यांनीही भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले असून युद्धाची धमकीही भारताला दिली होती. याचा परिणाम पाकिस्तानमधील अर्थव्यवस्थेवर झाला असून तेथे महागाई वाढली आहे.