रत्नागिरी – येथील रसाळगडाच्या दक्षिण दिशेकडील दरीमध्ये 400 फूट खोल दरीमध्ये मध्ययुगीन काळातील पाण्याचे स्तंभ टाके असून त्याच्या शेजारीच अर्धा टन वजनाची आणि 5 फूट लांबीची तोफ हि वर्षोनुवर्ष दुर्लक्षित स्थितीत होती.
अवघ्या 4 तासात संस्थेच्या 40 दुर्गसेवकांनी ही तोफ गडावर आणली आणि गडावरील झोलाई देवीच्या मंदिरासमोर तोफ ठेवण्यात आली. या वेळी दुर्गसेवकांनी एकच आनंद जल्लोष व्यक्त केला. कित्येक वर्षांपासून हि तोफ दरीमध्ये पडून दुर्लक्षित होती. ही तोफेस आज गडावर विराजमान झाली असून आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात. ही कामगिरी ह्याद्री प्रतिष्ठानने केली आहे. त्यांच्या वतीने दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्क्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात असून आजवर मंडणगड, बाणकोट किल्क्यांवर तोफांना तोफगाडे बसविण्यात आले व अनेक दुर्गसंवर्धन माहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भातील अहवाल राज्य पुरातत्व विभागाल सादर करण्यात आला असून सध्या गडावरील एकूण 18 तोफा आहेत. हा किल्ला जिल्ह्याच्या पर्यटन विकास दृष्टीने महत्वाचा असून जिल्ह्यातील शिवप्रेमींनी या गडाच्या संवर्धन कार्यात सामील व्हावे असे आव्हान विविध स्थरावरील काम करणाऱ्या लोकांकडून केले जात आहे.