नगर – यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जात असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व त्यांचे सोहळ्याचे बुधवार नगरमध्ये आगमन होत आहे. त्यामुळे पालखी दोन दिवस नगरच्या बाजार समितीत मुक्कामी असेल शुक्रवार (दि. 16)पालखी व दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. बुधवारपासून तीन दिवस म्हणजे 14, 15 व 16 जून रोजी बाजार समितीतील भुसार व भाजीपाला बाजार बंद राहणार आहे.
तसेच सर्व फळबाग, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी या कालावधीत शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, नगर बाजार समितीच्या नेप्ती बाजार आवारात कामकाज नेयमीत सुरू राहणार आहे, असे बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ आणि संचालकांनी सांगितले आहे.