नागपूर – सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. काल सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना अचानक लाईट गेली. यामुळे काही काळासाठी कार्यक्रमाचा खोळंबा झाला. यावरूनच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
“वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं.. आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्ताने तरी सरकार त्याची दखल घेईल का?” असा सवाल रोहित पवार यांनी ट्विटद्वारे उपथित केला.
वीज गेल्यावर कशी अडचण होते, हे आज संपूर्ण सभागृहाला प्रत्यक्ष अनुभवता आलं. खुद्द ऊर्जामंत्री बोलत असतानाच वीज गेल्याने बल्ब, माईक बंद पडून कामकाजही बंद पडलं..
आपल्या बळीराजाला व छोट्या उद्योगांना तर मिनिटामिनिटाला विजेसाठी झुंजावं लागतं! यानिमित्त तरी सरकार त्याची दखल घेईल का?— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 20, 2022
अधिवेशनादम्यान सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सध्या सुरु असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद देखील यावेळी सभागृहात पाहायला मिळाले. तर या अधिवेशनात देखील ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी पाहायला मिळाली.