नवी दिल्ली – आयकर विभागाने आत्ता पर्यंत सुमारे 39 लाख आयकर दात्यांना 1 लाख 32 हजार कोटी रूपयांचा आयकर परतावा दिला आहे अशी माहिती या विभागातर्फे आज देण्यात आली. यात व्यक्तीगत आयकरदात्यांच्या 35 हजार 123 कोटी रूपयांच्या परताव्याचाही समावेश आहे.
तर 97 हजार 677 कोटी रूपये कॉर्पोरेट परताव्याचे आहेत. आयकर विभागाकडून 1 लाख 93 हजार 813 प्रकरणांत कॉर्पोरेट आयकर परतावा जारी करण्यात आला आहे. 1 एप्रिल 2020 ते 10 नोव्हेंबर 2020 या काळातील हा परतावा आहे.
यापुढील काळातही आयकराचे परतावे तातडीने संबंधीत खातेदारांच्या खात्यावर जमा केले जात आहेत. त्यात नाहक विलंब होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.