नगर – भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आली, तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तसेच अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.
नगर जिल्हा सहकारी बॅकेच्या वतीने अकोळनेर, नारायण डोह ,चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलचा चेक वाटप करतानाते बोलत होते. बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विजय जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले, संतोष कुलट, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव, अशोक झरेकर, नंदा शेंडगे, सविता मेहत्रे, शीतल जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.
राधाकृष्ण वाळुंज म्हणाले, शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला खेळते भांडवल म्हणून मदत करण्याचे काम सुरु केले आहे.शेतकऱ्यांना कमी कागदपत्रामध्ये कर्ज मिळण्याचे काम पहिल्यांदाच घडले आहे. तसेच सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचीही पहिलीच वेळ असल्याचे ते म्हणाले.