<div>भोपाळ : मध्य प्रदेशातील अलिराजपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जी आजही आधुनिक समाजाचे दावे खोटे असल्याचे दाखवून देते. <span style="text-transform: initial;">एका मुलाशी फोनवर बोलल्याच्या कारणावरून मुलीला तिच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना </span><span style="text-transform: initial;">अलिराजपूरमधील </span><span style="text-transform: initial;">सोंडवा भागात घडली आहे. </span></div> <div></div> <div>हि मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती मिळते आहे. ती मुलांशी फोनवर बोलते म्हणून तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण करीत मुलीचे केस कापून टाकले आहे.</div> <div></div> <div>उपविभागीय पोलिस अधिकारी बब्बर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.</div> <div></div>