सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी पहाणी करणार, सर्वत्र संतापाची भावना
नवी दिल्ली : देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारात सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या जवान महंमद अनीस यांचे घर पेटवून दिले होते. त्याच्या घराची पहाणी करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचे वरीष्ठ अधिकारी भेट देणार आहेत. त्याच्या घराचे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन सरकारकडून त्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
दिल्लीत उसळलेल्या या दंगलीत या जवानाच्या घाराची लूट करण्यात आली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितले की, त्यांच्या मुलीचे लवकरच लग्न होणार होते. त्यासाठी साठवलेले पैसे आणि सोने सर्व काही नाहीसे झाले. त्यामुळे संतापाची भावना व्यक्त होत आहे.
ईशान्य दिल्लीत चार दिवस झालेल्या दंगलीत सुमारे 42 जण मरण पावले आहेत. मरण पावलेल्या बहुतांश जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, याकडे डॉक्टर लक्ष वेधत आहेत. दरम्यान , दंगलग्रस्त भागात हळूहळु जनजीवन सुरळीत होत आहे. पोलिसांनी 400 शांतता कमिट्यांची स्थापना केली आहे. या दंगलीत बेघर झालेल्यांसाठी दिल्ली सरकारने निवारा केंद्र उभारली आहेत. तेथे सर्व मुलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.