कामशेत – मावळ तालुक्यात पहिला तहसीलदार होण्याचा मान पटकाविणाऱ्या अजिंक्य दत्तात्रेय सावंत या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अजिंक्य तहसीलदार झाल्यावर त्याच्या आईवडिलांना अभिनंदनाचे फोन येऊ लागले.
तळेगाव दाभाडेच्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजात त्यांनी बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन ही चार वर्षांची पदवी घेतली आणि त्यानंतर काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासाने तो स्पर्धा परीक्षेकडे वळला.गाव खेड्यातील अजिंक्यचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगनंतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नात त्याला मित्रांची सोबत मिळाली, आईवडिलांचे आशीर्वाद आणि बहीण भावाचे पाठबळ पाठीशी होते.
एकत्रित कुटुंबातील अजिंक्य यांची शेती आणि दूध व्यवसायाशी नाळ आहे. त्यांच्या आईवडिलांचा हाच उपजीविकेचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील सातवी शिकलेले तर आई नववी शिकलेली आहे. अजिंक्य स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला महापालिकेच्या अण्णा भाऊ साठे ग्रंथालयात अठरा किलोमीटर दुचाकी प्रवास करून यायचा. तेथे आठ ते दहा तास अभ्यास करून तो माघारी जायचा. घरातच सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असल्याने अजिंक्य लोकहिताला प्राधान्य देऊन काम करेल, असा विश्वास
गावाला आहे.