मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ किती आमदार गेले आणि किती राहिले हीच चर्चा सुरू होती. दुसरीकडे भाजपने या प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले. शिवाय, कोणताही नेता शिवसेनेतील गोंधळाबद्दल प्रतिक्रिया देत नव्हता. तर सतत टीका करणारे नेतेही शांत होते. मात्र आता भाजपनेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक झाले आहेत.
भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील माफियाराज सरकारचा अंत जवळ आला आहे, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
सोमय्या उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले की, तुम्ही मला तोतरा म्हणा, बोबड्या म्हणा, टमरेल म्हणा, भ** म्हणावं, चु** म्हणावं. पण हिशोब तर द्यावाच लागणार. त्या १९ बंगल्यांचा हिशोब घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असंही सोमय्या म्हणाले. ते भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
महाराष्ट्राच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला असून मुंबई महापालिकेचं माफियाराज मुंबईकरच संपवणार असंही सोमय्या यांनी म्हटलं.