मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांचे चक्र फिरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने धाड टाकली आहे. त्यांच्या सोबतच सीबीआयने आर्यन खान क्रूझ प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात त्यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने त्यांच्या मुंबई, दिल्ली, रांची आणि कानपूरमधील एकूण 29 ठिकाणी छापेमारी केली.एवढेच नाही तर सीबीआय कडून त्यांची तब्बल १३ तास चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. त्याच प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मिळून शाहरुख खानच्या जवळच्या लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी वानखेडेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एनसीबीनेच या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दिली होती. त्यानुसार समीर वानखेडे यांची प्राथमिक चौकशीदेखील झाली. तीन आयआरएस अधिकाऱ्यांनी आर्यन खान विरोधाच चार्ज लावले जावू नये यासाठी २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणी सीबीआयने कानपूर, रांची आणि दिल्लीत छापेमारी केली. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
CBI (Central Bureau of Investigation) registers a case against former Mumbai NCB zonal director Sameer Wankhede and three others in connection with a corruption case related to the Aryan Khan cruise case. The agency raided 29 locations in Mumbai, Delhi, Ranchi (Jharkhand) and… pic.twitter.com/Dw3CDru57q
— ANI (@ANI) May 12, 2023
समीर वानखेडे यांनी आर्यन खानला दोन वर्षांपूर्वी कथित क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यावेळी समीर वानखेडे हे मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी होते. वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय प्रमुख होते जेव्हा त्यांनी आणि इतरांनी 2021 मध्ये एका क्रूझ जहाजावर छापा टाकला होता. या प्रकरणी आर्यन खानने चार आठवडे तुरुंगात काढले. तथापि, “पुरेशा पुराव्याअभावी” मे 2022 मध्ये अँटी-ड्रग्स एजन्सीने त्याला सर्व आरोपांपासून मुक्त केले.
समीर वानखेडेविरुद्ध आर्यन खान प्रकरणात एनसीबीने दक्षता तपास केला होता, ज्याचा अहवाल गृह मंत्रालयालाही सादर करण्यात आला होता. या अहवालात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यासोबतच वानखेडेवर शाहरुख खानच्या कुटुंबीयांकडून 25 कोटी रुपयांची मागणी करून त्यातून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.