नवी दिल्ली – संसदेत अदानी प्रकरणावर चर्चा होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वतोपरी प्रयत्न करतील. मात्र, अदानींमागील शक्ती देशाला समजायला हवी, अशी भूमिका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मांडली. संसदेत चर्चा होऊ न देण्यामागे एक कारण आहे. ते तुम्हालाही ठाऊक आहे. चर्चा व्हायला हवी आणि सत्य समोर यायला हवे.
कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड व्हायला हवा, असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. सरकार आणि हम दो, हमारे दो याविषयी मी बराच काळापासून बोलत आहे. मात्र, सरकार संसदेतील चर्चेला घाबरत आहे, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला. चर्चेची आणि चौकशीची मागणी विरोधकांनी लावून धरल्याने गदारोळ होऊन सोमवारीही संसदेचे कामकाज ठप्प झाले.