केवडिया – देशाचे शत्रू भारताची एकता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा कोणत्याही प्रयत्नांविरोधात देशाने खंबीरपणे एकी दाखवत उभे राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या येथील स्मारकावर जाऊन मोदींनी आदरांजली वाहिली त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केले.
काल मोरबीत झालेल्या दुर्घटनेतील मृतांनाही त्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण करीत त्यांचे स्मरण केले. एवढी मोठी दुर्घटना आपल्या आयुष्यात आपणर्पूी कधी ऐकली नव्हती, या दुर्घटनेमुळे आपण फार व्यथित झालो आहोत,असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Rashtriya Ekta Diwas is a tribute to the invaluable role of Sardar Patel in unifying our nation. https://t.co/mk4k21xpme
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2022
सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून पाळली जाते. त्याचा उल्लेख करीत ते म्हणाले की, भारतासाठी एकता ही कधीच गरज नव्हती.कारण एकता हेच भारताचे वेगळेपण आहे. आपल्या देशाची ही एकता आपल्या शत्रूंच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आजच्याच नव्हे तर हजारो वर्षापासून आणि आपल्या गुलामगिरीच्या काळातही सर्व परकीय हल्लेखोरांनी ही एकता मोडून काढण्यासाठी जे काही करायचे ते केले, असे ते म्हणाले. त्या प्रदीर्घ काळात जे विष पसरवले गेले, त्यामुळे आजही देश समस्यांना तोंड देत आहे.
देशाची फाळणी आणि त्याचा फायदा शत्रूंनी घेताना आपण पाहिला आहे असे मोदी म्हणाले.त्या भारत विरोधी शक्ती आजही प्रचलित आहेत, त्यांना देशातील लोकांना जाती, प्रदेश, भाषेच्या नावावर लढवायचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, लोक एकमेकांच्या पाठीशी उभे राहू शकत नाहीत अशा पद्धतीने इतिहासही मांडला जातो. आपण सर्व देशवासीयांनी एकत्र राहुन या शक्तीचा मुकाबला आणि पराभव करायचा आहे असेही मोदींनी यावेळी सांगितले.