सातारा जिल्ह्यातील अंगापूर एक आदर्श गाव. राजकारण, समाजकारण, शिक्षण, सहकार, क्रीडा आणि वारकरी संप्रदायामध्ये हे गाव स्वतःची वेगळी ओळख निर्माण असलेले आणि एक कुस्तीशौकीन गाव. या गावाचे समाजकारण आणि राजकारण दोन नावांशिवाय पूर्ण होत नाही ती दोन नावे म्हणजे संतोष विनायक कणसे आणि जितेंद्र विनायक कणसे. संतोष कणसे यांना संपूर्ण जिल्हा भाऊ म्हणून ओळखतो.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची मुलुख मैदानी तोफ, ख्यातनाम सुत्रनिवेदक, अभ्यासू व्याख्याते, उत्तम प्रवचनकार, हजरजबाबी आणि समयसूचक वक्ता. आपल्या लाघवी आणि पहाडी आवाजाची शैली निर्माण केलेला चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. अंगापूर पंचक्रोशीमध्ये त्यांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. राजकारणातील प्रदीर्घ अनुभवामुळे राजकारणातील नवोदित पिढी त्यांच्याकडे अभ्यासू राजकीय विश्लेषक म्हणून पाहत आहे.
राजकारणाबरोबरच त्यांनी व्यवसायात नवा आयाम निर्माण केला आहे. त्यांनी पाच वर्षपूर्वी वेद ऑफसेट प्रिंटर्स नावाचा व्यवसाय साताऱ्यात सुरू केला आणि अत्यंत खडतर संघर्ष करून व्यवसायाची उत्तम घडी बसविली आहे. सातारा शहरात ऑफसेट आणि डिजिटल प्रिंटींग क्षेत्रात संतोष कणसे यांच्या नावाचा नावाचा दबदबा पाहयला मिळतो. दुसरीकडे जितेंद्र विनायक कणसे राष्ट्रीय कुस्ती कोच, प्रयोगशील आणि आधुनिक शेतीचे नवनवीन प्रयोग करणारा कृषीनिष्ठ शेतकरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा निस्सिम भक्त, पोलीस आणि सेना दलात अनेक युवकांना भरती करणारा ट्रेनर आणि कुस्ती जगावी, वाढावी यासाठी महाराष्ट्रभर कुस्ती रसिकांसाठी कार्यरत राहणारा मल्ल.
हे दोन्ही भाऊ म्हणजे भागातील आदर्श व्यक्तिमत्त्वे आहेत. दोघांची क्षेत्रे वेगळी, शैली वेगळी, दोघांचा मित्र परिबार अफाट, अत्यंत निगर्वी आणि समाजासाठी सतत झटणारे आधुनिक भीमाअर्जुन म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना समाजाबद्दल ओढ आहे. देव, देश आणि धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे ही त्यांची भावना आहे. त्यांनी केलेल्या कामामागे त्यांना प्रेरणा आहे ती त्यांच्या मातोश्री सौ. पुष्पा विनायक कणसे अर्थात माई यांची.
सौ. पुष्पा कणसे यांना संपूर्ण गाव “माई’ म्हणून ओळखते. माईंचे बालपण पुण्यात गेले. माई पुण्यातील असल्यामुळे त्यांच्या वागण्यात बोलण्यात शहरी बाज दिसतो. त्यांचे शिक्षण जुने सातवी आहे. त्यांचा विवाह अंगापूरचे सैनिक विनायक कणसे यांच्याशी झाला. माईंनी मुलांना उत्तम संस्कार, शिक्षण दिले. आपण समाजाचे देणे लागतो आणि ते देणे आपण फेडले पाहिजे याबाबत त्या आग्रही असतात. त्यातूनच त्यांच्या दोन्ही मुलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असताना समाजकारणात स्वतःला झोकून दिले आहे. माई यांचा स्वभाव अत्यंत कडक शिस्तीचा.
त्यामुळे त्यांनी त्यांची दोन्ही मुलं निर्व्यसनी ठेवण्यात यश मिळविले आहे. या जमान्यात सुपारीच ही व्यसन नसणारी मुलं असणे, यापेक्षा आणखी काय भाग्य काय असावे. माई या उत्तम कर्मयोगी, आयुष्यभर प्रपंच केलाच पण आजही वयाच्या 70 व्या वर्षीही त्या नित्य नियमाने शेतात जातात आणि शक्य असेल ते काम करतात. रोज व्यायाम, काम यामुळे त्यांना उत्तम आरोग्य लाभले आहे. आजही त्यांना कसलेही औषध चालू नाही. शुद्ध आणि पुणेरी भाषा, कडक पण समजदार स्वभाव, शिक्षण आणि संस्कारासाठी आग्रही असलेल्या माई यांनी समाजासाठी काम करणारी दोन मुलं संस्कारित केली, ही गोष्ट अत्यंत अभिमानस्पद आहे. त्यांच्यासारख्या आदर्श मातेला शतदा नमन.
सौ. पुष्पा कणसे यांना संपूर्ण गाव माई म्हणून ओळखते. माईंचे बालपण पुण्यात गेले. माई पुण्यातील असल्यामुळे त्यांच्या वागण्यात बोलण्यात शहरी बाज दिसतो. त्यांचे शिक्षण जुने सातवी आहे. त्यांचा विवाह अंगापूरचे सैनिक विनायक कणसे यांच्याशी झाला. माईंनी मुलांना उत्तम संस्कार, शिक्षण दिले. आपण समाजाचे देणे लागतो आणि ते देणे आपण फेडले पाहिजे याबाबत त्या आग्रही असतात. त्यातूनच त्यांच्या दोन्ही मुलांनी आर्थिक परिस्थिती बेताची असताना समाजकारणात स्वतःला झोकून दिले आहे. माई यांचा स्वभाव अत्यंत कडक शिस्तीचा. त्यामुळे त्यांनी त्यांची दोन्ही मुलं निर्व्यसनी ठेवण्यात यश मिळविले.