नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि पत्रकारांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. मायदेशात परतल्यावर त्यांना करोना चाचणीचा आहवाल सादर करावा लागणार नसून त्यांना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता भासणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी ही विनंती केली होती.
त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या पथकाचे लसीकरण करण्यात आले आहे आणि टोकियोमध्ये नियमित करोना चाचणी घेण्यात येत आहेत.
त्यामुळे या सर्वांना आरटी-पीसीआर चाचणी अहवाल दाखविण्यापासून सूट मिळावी, अशी विनंतीही बात्रा यांनी केली होती ती मान्य करण्यात आली आहे.